वाशिममध्ये विद्यार्थिनींनी या वस्तूपासून बनवली राखी, सर्वत्र होत आहे कौतुक

0
11

वाशिम दि 22 ऑगस्ट (दिपक भारुका): रक्षाबंधन हा सण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो प्रत्येक बहिण-भाऊ या या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर भाऊ आपल्या बहिणीला आजन्म रक्षण करण्याची ग्वाही देत असतो.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनाचही संरक्षण झालं पाहिजे म्हणून याच दिवसाच औचित्य साधून रक्षाबंधन वेगळी पध्दतीने साजरा केला. मुलींनी बोर, चारोळी, सुपारी, पुदिना, मोहरी तांदूळ, गहू, उडीद, मूग, तूर जवस अशा वेगवेगळ्या वनस्पतीच्या बियांपासून राख्या तयार केल्या आणि या राख्या आपल्या भावांना बांधून त्या बियांपासून नवीन झाडं लावण्याची विंनती केली.

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील गोभणी येथील शिवाजी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. केनवडकर सरांच्या संकल्पनेतून ही पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी असणाऱ्या राख्याची निर्मिती केली. सोबतच शाळेतील वृक्षांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली. यावेळी मुलींनी शाळेतील सर्व शिक्षकांना राख्या बांधल्या आणि प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येकी किमान एक झाड लावण्याचे अभिवचन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here