यवतमाळ दि. 01 ऑक्टोबर : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सकाळी बाभुळगाव, कळंब व यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनामर्फे सर्वतोपरी मदत दिल्या जाईल, अशी हमी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, जिल्हा अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसिलदार डॉ. सुनिल
चव्हाण (कळंब), विवेक कुमरे (बाभुळगाव), कुनाल झाल्टे (यवतमाळ), संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत पालकमंत्री यांनी प्रशासनाला सुचना दिल्या.
पालकमंत्री भुमरे यांनी आज सकाळी 8.30 वाजेपासूनच आपल्या दौऱ्याला सुरूवात केली व बाभुळगाव तालुक्यात अंतरगाव येथे अमोल प्रेमदास राऊत यांच्या शेतात, मांग-सावंगी येथे विलास विठ्ठलराव खोडे, नारायण गणपत बावणे व रेवताबाई अंबादास दांडगे यांच्या शेतात भेट दिली. तसेच कळंब तालुक्यात कळंब येथील गुलाब सिताराम बान्ते, हिरा रामभाऊ पाचघरे, नईमुल्ला अमानुल्ला खान, धनोडी येथे मंगेश भास्कर महिंद्रकर, चापर्डा येथे रामराव विठ्ठल उईके यांचे शेतात तसेच यवतमाळ तालुक्यात मडकोना इत्यादी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतात भेट देवून पाहणी केली.
याप्रसंगी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






