चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील 14, 15, आणि 13 या वयाच्या तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात नावावर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने नावात (डोंगा) बसलेल्या तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत मुलींमध्ये सोनी मुकरू शेंडे, समृद्धी ढीवरू शेंडे आणि पल्लवी रमेश भोयर यांचा समावेश आहे
तिन्ही तरुण मुलींच्या अचानक मृत्युने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे





