सोनिया गांधींना महाविकास आघाडी सोबत यायचे नव्हते परंतु….नाना पटोले यांचा खुलासा

0
10

महाराष्ट्र दिनांक 14 मार्च  (प्रतिनिधी)

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोलताना सरकार निर्मितीची खास गोष्ट सांगितली. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत काँग्रेस सत्तेत आहोत. सोनिया गांधींना या सरकारमध्ये यायचं नव्हतं मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचं होतं म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत आलोत, असं नाना पटोले म्हणाले.

आज बीडच्या गेवराईत 14 वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी प्रदर्शनाचं उदघाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

“भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत काँग्रेस सत्तेत आहोत. सोनिया गांधींना या सरकारमध्ये यायचं नव्हतं मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचं होतं. म्हणून आम्ही महविकास आघाडीसोबत आलोत. सोनियाजींनी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको, मात्र पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे”, असं गुपित नाना पटोले यांनी सांगितलं.

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी केली. याविरोधात भाजपने राज्यभर निदर्शने केली. या विषयी भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “दुसऱ्यांवर कारवाई झाली की पेढे वाटायचे आणि स्वत:वर कारवाई व्हायची वेळ आली की आंदोलन करुन सर्वसामान्यांना त्रास द्यायची, ही भाजपची जुनी संस्कृती आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here