पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामावेशक विचारसणीकडे वाटचाल करायची असल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहेे
मोदींना स्वत:ला सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय घ्यायला आवडतं, आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटतं असं निरिक्षण मोदींच्या स्वभावासंदर्भात बोलताना गुहा यांनी नोंदवलं आहे. प्रसिद्ध पत्रकार करण थापा यांना ‘द वायर’साठी दिलेल्या मुलाखतीच्या शेवटी मोदींचा स्वभाव बदलेलं का यासंदर्भात भाष्य करताना गुहा यांनी मोदींना उद्धव यांचा आदर्श घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.






